रविवार, १ जानेवारी, २०१७

*बाईकसवारी:-एक प्रवास*
🌅🏞🛣दिवस पहिला🏞🛣🌄
🌍🌍🌍भाग तीन 🌍🌍🌍
       साधारणपणे 3 वाजता साताऱ्यात आलो थोडीशी पोटपूजा करून आता पुढे काय?  याचे नियोजन करू लागलो  साताऱ्यात अनेक पाहण्यासारख्या गोष्टी , ठिकाणे आहेत बऱ्याचदा आपण सातारा म्हटले की याआपण अजिंक्य तारा, कास पठार, सज्जनगड, बामणोली इथेच थांबतो पण अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत  मला अजिंक्यतारा पहायचा होता आजपर्यंत एकदाही पहिला नाही पण तो पाहण्यासाठीबराच वेळ लागला असता आणि पुढचे नियोजन बिघडले असते 
          त्यामुळे आज दिवसभर संग्रहालय व सज्जनगड हि दोन ठिकाणे पहावी असे ठरवले 
   छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून (पवई नका) व बसस्टँड पासून अगदी जवळच संग्रहालय आहे अन तिकीट फक्त 3 रु दर सोमवारी व शासकीय सुट्टीच्या दिवशी हे बंद असते संग्रहालयात शिवयुगातील अनेक वस्तू,साहित्य,वस्त्रे, आभूषणे, हत्यारे आहेत हे पाहताना शिवकाळात गेल्याचा भास होतो अर्धा तास सर्व वस्तू पाहण्यास पुरेसा आहे शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे संग्रहालय पाहून मी पुढील ठिकाण पाहण्यासाठी चाललो होतो या अगोदरही मी सज्जनगड पाहायला गेलो होतो पण तेंव्हा मात्र दिवस मावळल्यानंतर किल्ल्यावर गेलो होतो त्यामुळे फक्त रामदास स्वामी यांच्या समधीचेच दर्शन घेतले होते तोही एक मस्त अनुभव होता आज मात्र माझ्याकडे पुरेसा वेळ होता साताऱ्यापासून जवळच्या ठिकाणांपैकी एक कास पठार पण आज मी सज्जनगड पाहायला जाणार होतो एकेरी रस्त्याने गाडीवर जात असताना सभोवरचा मुलुख न्याहळत होतो मन प्रसन्न झाले होते आणि माझ्या मनातील एकटेपणा निघून गेला होता सातारा शहरातून बोगद्यातून बाहेर पडलो कि थोड्या वेळाने सज्जनगडाचे दुरूनच दर्शन होते 
माझा मात्र रस्ता चुकला अन मी कास पठाराच्या दिशेने निघालो होतो बोगद्याच्या अलिकडूनच मी वळलो खरे तर बोगद्यातून पुढे जायला हवे होते असो आणि त्या वेळी घाटात अनेक माकडे होती ती खूप  भुकेलेली होती चार किमी जाईपर्यंत माझ्या लक्षात आले नाही आणि मग मी थांबून एका शाळकरी मुलाला विचारले कारण माझ्या लक्षात आले होते की येथून पुढे निघालो तर कास पठार ला जाईन कारण मागे मी कास पठारला आल्यावर इथल्याच एका हॉटेलात जेवण केले होते रस्ता एकेरी होता मागे वळून मी घाटातून येत होतो त्यावेळी काही ठिकाणी फोटो काढले येथून साताऱ्याचे व अजिंक्यताऱ्याचे नयनमनोहर दर्शन होते अन घाटात असणाऱ्या माकडांना माझ्या जवळची  चपाती दिली माझ्या घरून आणली होती पण ती खायला वेळही मिळाला नाही अन भूकही लागली नव्हती असो घाटात वर्दळही तुरळकच होती त्यामुळे माकडे रस्त्यावर उतरून इकडून तिकडे उड्या मारत होती
   दिवस मावळतीकडे कलत होता मी बोगद्यातून वळून सज्जनगडाच्या दिशेने निघालो अगदी 10-15 मिनिटात मी गडाजवळ आलो गडाच्या पायथ्याजवळ एक खूप उंच हनुमानाची मूर्ती आहे  तेथील समर्थ सृष्टी पाहण्यासारखी आहे व महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन सृष्टी आहे रामदास स्वामीच्या जीवनातील महत्त्वाच्या 15 प्रसंगाची माहिती देण्यात आली आहे तिकीट 40 असून 25-30 मिनिटांची डॉक्युमेंटरीहि तेथे दाखवली जाते पण तेवढा वेळ माझ्याकडे नसल्याने मी मनात असूनही ती पाहू शकलो नाही
गाडी सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंगला लावली देवस्थानचे पार्किंग असून रात्रंदिवस चालू असते साडेपाच वाजले असतील आणि मी पाण्याची बाटली घेऊन गडाकडे निघालो होतो थोडे अंतर चालून गेलो की लगेच फरसबंदी व सोप्या पायऱ्या आहेत वातावरण अगदी छान असते पायऱ्या चढून जात असताना रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुतीच्या मूर्तीही आहेत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ आलो असता पाच मिनिटात फोटो काढून घ्या असा आग्रह दुकानदार करू लागला मी अश्या फ़ंदात सहसा पडत नाही पण तेथे मी अनेक पेहराव फेटे , जिरेटोप व पगड्या पाहून मी त्यांना माझा फोटो काढण्यास परवानगी दिली आणि मग त्या वेळी त्यांनी आपल्या सर्व प्रकारच्या आभूषणांनी मला सजवून फोटो काढला आणि लगेच प्रिंटही करून दिला त्याचबरोबर माझ्या फोनमध्येही फोटो काढून दिला 
        परिधान केलेली वस्त्र अन अलंकार काढावेसे वाटत नव्हते पण नाईलाज होता अतिशय जड अंतःकरणाने एक एक आभूषण उतरवले समर्थ महाद्वारातून येत असताना गडाची माहिती देणारा नकाशाही पहिला त्याचा खूप उपयोग होतो सज्जनगडावर पाहण्यासारख्या अनेक वस्तू व वास्तू आहेत त्याची माहिती मी विस्ताराने इथं लिहीत नाही पण आजही रात्री 8:45ला गडाचे दरवाजे बंद केले जातात आणि पहाटे पाचला उघडले जातात 
     जवळची बाटली व चपला ठेऊन मी मठात गेलो एकदम निरव शांतता पसरली होती व त्यामुळे मला खूप छान वाटत होते समर्थांचा पलंग , कुबडी पानपुडा समर्थ शिष्य कल्याणस्वामी हे पाणी आणत असलेला हंडा अशा अनेक  वस्तू आहेत मठाजवळच लागून असलेल्या समाधी मंदिरात प्रवेश केल्यावर मनाला शांती लाभली अन मनप्रसन्न झाले काहीवेळ ध्यान करून मी बाहेर पडलो समर्थानी स्थापन केलेल्या मारुतीचे दर्शन घेऊन समाधी परिसरात आलो होतो स्पिकरवर वाजणारी रामधून अन मावळतीकडे कलणारा भास्कर यामुळे वातावरणात एक प्रकारचे कारुण्य पसरले होते आणि माझं मन मात्र प्रसन्न आणि शांत झाले होते 
पायथ्याला असणाऱ्या परळी गावाच्या नावावरून त्याचे नाव परळीचा किल्ला म्हणून ओळखला जात होता पण स्वामी रामदास यांच्या वास्तव्यामुळे त्याचे नाव सज्जनगड असे ठेवण्यात आले समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य या किल्ल्यावर होते सन 1682 मध्ये स्वामी समाधिस्थ झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांची समाधी बांधून घेतली या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व रामदास स्वामी यांच्या चर्चा, मसलती होत असत
     गडावर भोजनाची अन निवासाची मोफत सोय उपलब्ध आहे सहा वाजले होते आणि मंदिरात मनाचे श्लोक पारायण सुरु झाले होते "मना सज्जना……" सहा ते नऊ या काळात मनाचे श्लोक पारायण , दासबोध पठण व नऊ वाजता भोजन असते माझा पाय निघत नव्हता पण मुक्काम साताऱ्यात करायचा असल्याने मी अतिशय कष्टाने तेथून निघालो आणि मनात मात्र "मना सज्जना……" चे सूर गुंजन करत होते गडाचे दरवाजे आजही नेमाने नऊला बंद केले जातात गडावर अनेक पाहण्यासारख्या वास्तू आहेत चढणंही फारसे नाही समर्थांच्या व शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि इथल्या शांत , गंभीर वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी यायलाच हवे.
        मग काय? येणार ना!!
शब्दांकन
शंकर शिंदे
संपर्क:- 9423039683
                          मागील सर्व भागांच्या  पोस्ट वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://shankarshinde01.blogspot.in
आणि
माझ्या सहलीचे  सर्व फोटो पाहण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/jyqck3
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!!
या लेखमालेच्या संबंधित काही मार्गदर्शन , सूचना करायच्या असतील तर सदैव आपले स्वागतच आहे
©® कॉपी&पेस्ट करायचे असल्यास वरील लेखात व मजकुरात बदल करू नये

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा