मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

चारधाम यात्रा

*गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ व हेमकुंड साहेब...*

                         *पुष्प - ३*


ऋषिकेश होऊन पुढे निघालो. पहाटे पावणे चार वाजता रामानंद आश्रम सोडला. गल्लीबोळातून चालत असताना, १-२ श्वान अंगावर धावून आले. मी शांतपणे चालत राहिलो. मी निरुपद्रवी आहे हे लक्षात आल्यावर ते शांत झाले.  वाटेत एक-दोन रिक्षाचालक ग्राहकांची वाट पहात बसले होते.  गुगल बाबा की जय. तो दाखवत असलेल्या रस्त्यावरून गंगा किनार्‍यावरुन चाललो होतो. दूरवर कुठेतरी श्वानांचा आवाज येत होता. किनाऱ्यावरून चालताना  उजव्या हाताला गंगामैयाचा खळखळ आवाज शांततेत जाणवणारा. तर डाव्या हाताला आश्रम, हॉटेल, लॉजेस. उजव्या हाताला *जानकी सेतू*, पादचारी आणि दुचाकींसाठी बांधलेला. अंधारात त्याच्यावरील दिवे लक्ष वेधून घेत होते. बसण्यासाठी बांधलेल्या तसेच गंगा किनारी काही यात्रेकरू उघड्यावर झोपले होते. पहाटेच्या वेळी रस्त्यावर मी एकटाच.

रामानंद आश्रम मनाला भावला.  दिखाऊपणा नाही, भपका नाही‌.  तेथे राहण्याचा योग आला. वेळ आली राहिलो, आनंद घेतला, निघालो... आपल्या सर्वांना नदी, नाले, झरे, वारा यांच्यासारखे वाहते राहता यायला पाहिजे.  वाहणारे पाणी स्वच्छ राहते. मनाला भावते.  रोगराई होत नाही. बंद खोलीतील हवा कुबट होते. तसेच माणसाने सुद्धा सतत वाहते राहायला पाहिजे. याचा अर्थ संसार सोडून संन्यासी व्हावे असे नाही.  तर घराबाहेर पडून प्रवास 
करण्याऐवजी शरिराचे चोचले पुरवणाऱ्या ठिकाणी थांबून, अडकून पडू नये. नाहीतर एक प्रपंच सोडायचा आणि दुसरा तयार करायचा असे होते.  हे लक्षात येत नाही, हे खरे.
चरैवेति चरैवेति...
चालत राहा... चालत राहा...

चालताना वाटेत पेड पार्किंग बाहेर बसलेल्या दोघांना नरेंद्र नगर चा रस्ता विचारला. त्यांनी दाखवलेल्या दिशेने चालू लागलो.  त्यातला एक जण म्हणाला बाबूजी नरेंद्रनगर तो यहा से बहुत दूर है टॅक्सी करनी पडेगी.  मी ठिक आहे असे म्हणालो आणि पाऊल उचलले. पुढे चढाचा रस्ता लागला.  गुगल बाबांनी जिथे वळायला सांगितले होते तिथे रस्त्यावर पाणी जाण्यासाठी चारी बांधली होती आणि त्याच्या मागे जंगलात जाणारी पायवाट दिसत होती. गुगल बंद केले व तसाच पुढे चालत राहिलो. रस्त्यावर विचारायला कोणी नव्हते.  पुढे गेल्यावर हायवेवर पाटी लागली नरेंद्र नगर.  डाव्या हाताला वळलो. आपले लक्ष नरेंद्रनगर होते.  इथून पुढे चढाचा रस्ता... घाट... घाट आणि घाट.  हिमालयात जाण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली. समोरून मागून वाहने चालली होती. अर्धा तास चालल्यानंतर एका ठिकाणी तीन रस्ते येऊन मिळाले होते. तेथे पोलिसांनी पुढे जाणारा रस्ता बंद केला होता.  चौकशी केल्यावर पुढे दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद होता व राडारोडा उचलून रस्ता क्लिअर करण्याचे काम चालू होते. त्यामुळे रस्ता बंद केल्याचे त्यांनी सांगितले. थांबलेल्या वाहनातील, रात्रभर प्रवास करून आलेले प्रवासी बराच वेळ वाहन थांबून ठेवल्यामुळे त्रस्त होऊन गाडीतून खाली उतरून येरझाऱ्या मारत होते. पोलीस चेक पोस्ट शेजारीच काली मातेचे मंदिर होते. सकाळच्या शांततेत कोणीतरी घंटा वाजवली त्याचा आवाज निरव शांततेत छान घुमला. मी चालत चाललो आहे, असे सांगितल्याने मला पुढे जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली.पोलिसांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी पुढे निघालो.


 माझ्यासोबत एका हातात काठी व एका हातात पाण्याचा कॅन घेऊन एक जेष्ठ नागरिक पुढे चालले होते. झप झप  चालून त्यांना गाठले आणि चौकशी केली.  त्यावर त्यांनी मी व्यायामाला चाललो असून त्यांचे नाव केपीएस नेगी असे त्यांनी सांगितले . हातातला कॅन,  लावलेल्या झाडाला पाणी घालण्यासाठी घेऊन जात आहे असे ते म्हणाले नेगी हे आडनाव ऐकल्यावर मला पूर्वी भारतीय हॉकी संघात असलेल्या मीर रंजन नेगी या गोलकीपर ची आठवण झाली. चालताना ते हातातील काठी रेलींगवर आपटत आवाज करत चालले होते. याचे कारण विचारले असता रात्री रस्त्यावर हत्ती येतात‌. त्यांना पळवण्यासाठी मी काठीचा रेलींगवर आवाज करतो असे त्यांनी सांगितले. ऐकून माझी दातखीळ बसली.
काठीच्या आवाजाने बाकी जंगली पशु पळून जातात. पण हत्ती मात्र जाम हलत नाही. तो ठाम उभा राहतो व प्रसंगी अंगावर धावून येतो अशी पुष्टीही त्यांनी जोडली.  हे गृहस्थ दहा मिनिटात परत जाणार होते. पुढे अंधारात घाट रस्त्यावर जंगलातून मला एकट्यानेच प्रवास करायचा होता. सगळाच उत्तराखंडाच्या घाट रस्ता जंगलाचा आणि प्राणी असलेला असा आहे.
हा प्रसंग माझ्यावर आला असता तर सामान टाकून पळून जाण्याशिवाय माझ्या हातात दुसरे काही नव्हते.  बघू या. गुरुदेव दत्त म्हणालो, जे येईल त्याला सामोरे जाण्याचे ठरवले आणि मी रेलींगवर काठी आपटत पुढे निघालो‌.

नरेंद्र नगर, हिंडोलाखाल, दुवाधार, आगराखाल, फकोट, बेमुंडा, खाडी, नांगणी, चंबा ही रस्त्यातील काही गावांची नावं.  गूगल बाबांनी दाखवलेल्या दोन गावाच्या मधील अंतर आणि प्रत्यक्षात अंतर यात फरक असल्याचे लक्षात आले. चंबाला नाष्टा केला चहा पिताना टपरीवाल्याशी बोलताना तो म्हणाला की, येथून गंगोत्री दोनशे किलोमीटर आहे. नवीन धरण बांधल्यामुळे आधीचा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे गंगोत्रीला जाताना तीस ते पस्तीस किलोमीटरचा फेरा पडतोय व त्यामुळे अंतर वाढले आहे अशी माहिती त्यांनी टपरी चालकाने मला पुरवली.

उत्तराखंड म्हणजे डोंगरी भाग. गंगोत्रीला जाताना जास्त चढ उतार कमी.  या राज्यात अनेक डोंगर रांगा आहेत.  येथील सर्वात मोठे शिखर नंदादेवी. आपण सुरुवात करतो छोट्या डोंगरातून पुढे हळूहळू गगनचुंबी सुळके स्वागतासाठी उभे असतात. त्यानंतर हळूहळू दिसू लागतात बर्फाच्छादित डोंगर आणि त्यांच्या अंगावर वाढलेले सूचिपर्णी वृक्ष. 

या भागात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ( BRO ) आणि स्थानिक प्रशासन यांचे रस्ता बांधणी व  देखभाल आणि दुरुस्ती यांचे काम ३६५ दिवस चालूच असते. कोसळलेल्या दरडी उचलणे, रस्ता मोकळा करणे, वाहून गेलेला रस्ता पुन्हा नीट करणे, पूल दुरुस्त करणे,  कोसळण्याची शक्यता असलेल्या दरडी उतरवणे अशी अनेक कामे ते अविश्रांत करत असतात. सर्व रस्त्यावर जागोजागी पाट्या लावलेल्या दिसून येतात येथे थांबू नका, वाहन उभे करू नका, दरड कोसळण्याची शक्यता इत्यादी... वाटेत एका ट्रकचा मागचा ॲक्सल तुटून , मागील दोन चाके वेगळी झाली होती. 

प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची धडपड चालू आहे. जसे जसे आपण पहाडी भागात आत जातो तसे तसे सर्व गोष्टींचे परिमाण बदलत जातात उपलब्ध साधन संपत्ती, सुविधा या कमी होत जातात.  या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यात जमा आहे. सर्व भार खाजगी वाहतूक व्यवस्थेवर सोपवलेले दिसतो. सहाजिकच नफेखोरीसाठी जास्त प्रवासी भरून वाहने निघणे यावर कंत्राटदारांचा भर असतो. पंचवीस क्षमतेच्या बसमध्ये ४५ लोक भरले जातात. हात दाखवल्यावर वाहन उभे राहते. भाजीपाला, दूध, फळे, किराणामाल दूरवरून आणावा लागतो.
१०० किलोमीटरच्या परिसरात एखादे कॉलेज. इंजीनियरिंग कॉलेज राज्याच्या मुख्यालयामध्ये म्हणजे डेहराडूनला. आरोग्य सेवांची व्यवस्था तर विचारूच नका. जिल्हा आरोग्य केंद्रांमध्ये एक पुरुष व एक महिला डॉक्टर. तेच सर्व आजारांवर उपचार करणार. बाळंतपणात गुंतागुंत निर्माण झाल्यास पेशंटला सुरक्षित रुग्णालयात हलवे पर्यंत रुग्ण दगावणावरच. एकट्या पुणे शहरात ७० हून अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत असे समजते. आपला आदिवासी भाग व येथील दुर्गम डोंगरी भाग यात फार फरक नाही. स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरी पण आदिवासी आणि डोंगरी लोक अजून दुर्लक्षितच आहेत असे खेदाने नमूद करावेसे वाटते. दोन वर्षांच्या कोव्हिडच्या कालावधीत इथे काय परिस्थिती झाली आहे याचा आपण अंदाज तरी बांधला आहे का ?

गुरुदेव दत्त...
🙏

क्रमशः ...

©️ लेखक व वाटसरू
*उदय नागनाथ*

चारधाम यात्रा

*चारधाम पदभ्रमण यात्रा...*

*गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ व हेमकुंड साहेब...*

                         *पुष्प - २*

हरिद्वारहून पहाटे ५ वाजता ऋषिकेश ला प्रमाण केले.

पहाटे लवकर उठून आवरून, सॅक भरली. धर्मशाळेत एक लखनऊ चा बारा तेरा वर्षाचा मुलगा काम करत होता. छोटू त्यांचे नाव. अगदीच कोवळा मुलगा होता. बिचाऱ्याला या वयात काम करावे लागत होते, हे पाहून वाईट वाटले.  अशा परिस्थितीत सुद्धा तो हसत मुख होता. त्याला चहा सांगितले चहा आणून दिला, साबण कुठे मिळते विचारले तर साबण आणून दिला‌ चार हेलपाटे मारले आधार कार्डची झेरॉक्स मिळावी म्हणून... जे सांगेल ते काम विना तक्रार करत होता. त्याला म्हणालो, उद्या पहाटे निघायचे आहे.  ५ वाजता दरवाजा उघडावा लागेल म्हणून तुला सांगून ठेवलं.   मी  दरवाजाजवळच्या खोलीत झोपतो. तुम्ही मला कधीही हाक मारा. मी दरवाजा उघडेन, काळजी करू नका, असे तो उत्तरला. दरवाजा आतून लॉक केल्यामुळे त्याला उठवण्याशिवाय पर्याय नव्हता. पाच वाजता निघताना त्याला झोपेतून उठवले. त्याने दरवाजा उघडला त्याला अच्छा केला आणि निघालो.
मजबुरी...या वयातील शहरी मुलं १० हाका मारल्या तरी उठत नाहीत. जबाबदारी मुलांना पोक्त करते. काही पैसे त्याच्या हातात ठेवून निघालो. तेवढेच मी करू शकत होतो.

गल्ली बोळ पार करत गंगामैयाच्या पुलावर आलो. पुलाच्या तोंडाशी सुमारे शंभर फूट उंचीचा एक मोठा केशरी रंगाने रंगवलेला जाडजूड खांब आणि त्याच्यावर त्रिशूल आणि डमरू लावलेले होते.  पहाटेच्या वेळी अंधारात त्रिशूल आणि डमरू विशेष लक्ष वेधून घेत होते.  पूल ओलांडला आणि हरिद्वार - ऋषिकेश हायवेवर आलो. डाव्या हाताला वळून ऋषिकेश कडे कूच केले.

 रात्रभर प्रवास करून आलेल्या लक्झरी गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या.  एकेक गाडीतून यात्रेकरू उतरून हरकी पोडीच्या दिशेने मार्गस्थ होत होते. मधूनच कार हायवेवरून आत वळत होत्या. चुकून पुढे गेलेल्या मोटारी बिनधास्त राॅंग साईडने येत होत्या. उतरणाऱ्या लोकांना हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी रिक्षा, सायकल रिक्षा यांची गर्दी झाली होती. रस्त्यावर चालणारा मी एकटाच होतो. रस्त्यावर शहरात असल्यामुळे दिवे होते. पण जसजसा पुढे गेलो तसे दिवे बंद झाले. पण तेवढ्यात फटफटू लागले. त्यामुळे हेड लाईट लावावा लागला नाही. पहाटे २० ते २२ डिग्री तापमान होते. आल्हाददायक वाटत होते,  परंतु वारं असल्यामुळे  थंडी बोचरी वाटत होती.कानाला गार लागायला लागल्यामुळे खिशातून रुमाल काढून कानावर बांधला. टोपी घातलेली होतीच. सर्व सामान पाठीवर सॅकमध्ये ठेवले होते. त्यामुळे दोन्ही हात मोकळे होते. 

हरकी पोडी संपल्यानंतर हरिद्वार संपतेच. सीमेवर असलेल्या एका बागेत  शंकराची एक भव्य मूर्ती उभी केलेली होती. त्याच्यावर फोकस टाकल्यामुळे मूर्ती अंधारातही दूरवरून सहजच दिसत होती. हरिद्वार नगरीत स्वागत करण्यासाठी आणि हरिद्वार नगरीचे रक्षण करण्यासाठी साक्षात महादेव सीमेवर पहारा देत उभे असावेत असे वाटले. मूर्ती खूप मोहक आहे. मूर्तीचे फोटो काढून पाय उचलले.

चालत असताना रस्त्याला दुकानाच्या हसू येईल अशा पाट्या दिसल्या एका दुकानावर पाटी लिहिली होती मुलाला मुन्नालाल टायर पंचर दुसऱ्या दुकानावर पाटी लिहिली होती, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मिक्साॅलाॅजी...मस्त पुढे निघालो.

रस्त्याने चालताना  कधी फूटपाथ तर कधी डांबरी सडकेवरून चालत होतो. मधूनच फूटपाथ गायब, तर कधी ओव्हरब्रीजच्या कामामुळे सर्व्हिस रोड छोटा...कुठे पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी यात्रेकरूंची गाडीत बसायची लगबग सुरू होती. 
एक मूर्तीकाराच्या दुकानात छान मूर्ती करून ठेवल्या होत्या. समोरच ठेवलेली भगवान बुद्धांची
मूर्ती जणू स्वागत करीत होती.

 आकाश लाल झाले, ७ वाजले होते. दोन तास चालत होतो. चहा पिण्यासाठी थांबलो. चहावाल्याने तंदूर पेटवला होता. एक जण हात शेकत होता. धुळीसाठी लावलेला मास्क उच्छ्वासामुळे ओला झाला होता. तो तंदूर वर गरम केला. मिथुन भाई,( दुकान चालकाचे नाव ) त्याने मस्त, गरमगरम, फक्कड व ग्लासभर चहा आणून दिला. १० मिनिटे विश्रांती झाली. पुढे निघालो.

८ वाजले. पोटात कावळे ओरडू लागले होते नाष्ट्याची व्यवस्था पाहायला हवी होती. परंतु कुठेही टपऱ्या दुकाने रेस्टॉरंट उघडण्याची चिन्हे दिसत नव्हती एका ठिकाणी उभा राहून एका मोटरसायकलला हात केला आणि विचारले तेव्हा त्यांनी सांगितले पुढे उजव्या हाताला आत गावात तुम्हाला दुकानात मिळतील तिथे नाश्ता मिळेल रस्ता क्रॉस करून पलीकडे गेलो वाटेत तिथला गावकरी भेटला तो म्हणाला गावातले सगळे दुकाने बंद आहेत समोर दिसणारे दोन स्नॅक्स सेंटर चालू आहे तिथे तुम्हाला नाश्ता मिळेल पुन्हा रस्ता क्रॉस करून समोर गेलो स्नॅक्स सेंटर मध्ये बसलो काय विचारले पराठे ची ऑर्डर दिली पराठे तयार होईपर्यंत घरी फोन करुन पत्नीसह वर्षाला सकाळी निघून तीन तासाचा प्रवास झाल्याचे कळवले आठ वाजेपर्यंत एकूण 13 किलोमीटरचा प्रवास झाला होता पाण्याचा वेग चांगला होता ख्यालीखुशाली कळवून व इतर चर्चा करून चौकशी करून कप्पा वरून फोन ठेवला व पुढे निघालो दोन पराठे त्याच्यावर अमूल बटर एक चहा पाण्याची बाटली एवढ्या सगळ्या चे बिल फक्त एकशे तीस रुपये.

चालताना पुढे  एक मोठा ओव्हरब्रीज लागला. तो खूप उंच होता. एवढे चढायला नको, म्हणून मी पुलाच्या सर्विस रोड कडून पुढे जाऊ लागलो. पुढे गेल्यानंतर तो सर्विस रोड पुलाच्या शेजारून जाता जाता  डेड एंड झाला होता हे मला नंतर समजले. तसाच पुढे चालत राहिलो. चालताना काय मला काही खरे वाटेना, म्हणून समोरून येणाऱ्या दोघांकडे चौकशी केली की हा रस्ता पुलाच्या तिकडे जातो का ? त्यातला एक जण म्हणाला याच रस्त्याने पुढे जा, तर दुसरा म्हणाला, जानवर का डर हैं, इधरसे मत जाव. पूल चढके पुरसे जाव. मी तसेच पुढे जायचे ठरवले.  वाटेत रेल्वे क्रॉसिंग होते. धड रस्ताही नव्हता. कसातरी उड्या मारत,हकसरत करीत पुलाच्या डाव्या हाताला पोहोचलो.  काल ज्या धर्मशाळेत मी उतरलो होतो तिथल्या मॅनेजर काकांनी मला आधीच घाबरवुन सोडले होते. पहाटे लवकर निघू नका, वाटेत जंगले प्राणी असतात. त्यामुळे मी पहाटे तीनच्या ऐवजी पाच ला निघालो आणि सकाळी सात वाजले तरी त्या दोघांनी मला जंगली प्राण्यांची भीती घालून  आणखीन घाबरून सोडले. तरीही मनाचा हिय्या करून मी पुढे चालत राहिलो. समोरून चालत आलेली एक दोन माणसे मागे गेली.   रेल्वे क्रॉसिंग करून पलिकडे गेल्यानंतर वनखात्याचे चेकपोस्ट दिसले. त्यांच्याकडे चौकशी करता ते म्हणाले की, रात्री पुलाखालून प्राण्यांची ये-जा असते आणि आता तर सकाळ झाली त्यामुळे आता प्राणी येत नाहीत. फुकट दोन तास उशीर निघालो, त्यामुळे उन्हात चालावे लागणार होते. कपाळावर हात मारला आणि चालू लागलो. पुलावरून सोडून गेलो असतो तर परवडले असते, इतका वेळ या सगळ्यात गेला होता.

 पुढे रस्त्यात ठिकठिकाणी बोर्ड लावले होते. मोतीचूर रेंज, राजाजी टायगर रिझर्व.  प्राणी रस्ता ओलांडतात, प्राणी रस्त्यात येऊ शकतात, गाडीतून उतरून नका.  हे मी घरी सांगितले असते तर घरच्यांनी मला सकाळी सातच्या आत बाहेर पडू नको सल्ला दिला असता. पण मी निघून इथे येईपर्यंत जवळजवळ दोन तास गेले होते व लक्ख उजाडले होते. 

ऊन वाढू लागले होते मी रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला गेलो. आता माझ्या समोरून वाहने येत होती. या बाजूला थोडी झाडी असल्यामुळे थेट ऊन अंगावर येत नव्हते. काही सोनचाफ्याची तर काही अनोळखी झाडे होती. चालताना झाडांची महत्त्व कळते. कितीही कडेने चालले तरी वाहने अगदी शेजारून जात होती. एकूणच पादचाऱ्यांना शून्य किंमत असते.

वाटेत काली कमलीवाले बाबा यांची मोठी गोशाळा लागली. मोठे आवार, सुसज्ज व्यवस्था, खूप गोधन होते. उत्तराखंड मध्ये काली कमलीवाले बाबा यांचे अनेक ठिकाणी आश्रम आहेत. बाहेरच्या मानाने तेथे माफक दरात निवासाची सोय होते.

 सावलीमुळे चालणे थोडे सुसह्य झाले. पण  ऊन लागायला लागल्यामुळे  तहान लागून सारखे पाणी प्यावे असे वाटत होते. सुरुवातीला पाणी   प्यायलो,नंतर ज्यूस, उसाचा रस, शहाळे असे करत करत वाटचाल चालू होती. दहा वाजता हायवेवर लावलेली आडवी पाटी दिसली... ऋषिकेश पाच किलोमीटर !!!  एक तासात आश्रमात पोहोचू असा विचार केला. गुगल मॅप उघडून स्वामी रामानंद आश्रमाचा पत्ता टाकला तर तो दोन तास पंधरा मिनिटे ची वेळ दाखवत होता.  चुपचाप गुगल मॅप बंद केले आणि पाय उचलले. 

थोडे पुढे गेल्यानंतर एक स्थानिक नागरिक भेटला. त्याला आश्रमाचा पत्ता विचारलं तर त्यांनी मला नीट पत्ता सांगितला तो म्हणाला पुढे गेल्यानंतर  चंद्रभागा ( एक क्षण नाव ऐकून मला आश्चर्य वाटले ) पूल लागेल. तो पूल ओलांडला की उजव्या हाताला वळा आणि मग विचारत विचारत पुढे जा. आश्रम खूप लांब आहे. तुम्हाला रिक्षाने जावे लागेल.  त्यावर मी हरिद्वार पासून चालत आलोय सांगितल्यानंतर तो चकित झाला. पण तरीही आश्रम खूप लांब आहे हे सांगणे त्यांनी मात्र सोडले नाही. नंतर माझी चौकशी केली, तुम्ही कुठून आलात कशासाठी चालत आलात  वगैरे विचारले माहिती दिल्यानंतर शुभेच्छा देऊन तो त्याच्या वाटेने, तर मी माझ्या वाटेने निघालो. सासूबाई आणि सासरे यांना वाटचालीची माहिती कळविली. त्यांचे आशीर्वाद होतेच. त्यांनी चार धाम यात्रेसाठी त्यांचा सहभाग व शुभेच्छा म्हणून आर्थिक वाटा उचलला. माझ्या या पूण्यकर्मात सर्वांचा वाटा होताच. एकट्याने सगळे थोडेच होते. 

चालताना उजव्या हाताला बहात्तर सीडी नावाचा घाट नावाचा घाट लागला. त्यावर मंदिर गंगेश्वर बजरंग महादेव अशी पाटी होती.  येथून खाली डोकावल्यावर ऋषिकेश च्या गंगेचे प्रथम दर्शन झाले. दोन मिनिटं उभा राहिलो, फोटो काढले आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. ऋषिकेशमध्ये चौकशी करीत रामानंद आश्रमात पोहोचलो. माझे बुलढाण्याचे एक मित्र श्री सुनील वायाळ यांनी त्यांच्या नातेवाईकां मार्फत सदर आश्रमात राहायची सोय केली होती. रजनीकांत, नरेंद्र मोदी हे स्वामी रामानंद यांचे शिष्य. मला पण आपण सेलिब्रिटी झाल्याचा फील आला...

श्री अशोक वायाळ यांची भेट घ्यायची होती.
आश्रमात प्रवेश करून त्यांची चौकशी केली तर ते समोरच उभे. नमस्कार केला. समक्ष भेट आज प्रथमच झाली होती. काल फोन करून मी उद्या १२-१ वाजेपर्यंत पोहोचतो आहे, असे कळवले होते. श्री अशोक वायाळ यांचे वडील ऋषिकेश ला संस्कृत शिक्षणासाठी. त्यांनी पुढे पीएचडी केली व येथेच स्थायिक झाले. स्वामी रामानंद तसेच त्यांचे उत्तराधिकारी  विद्यमान स्वामीजीं
यांचे ते अगदी निकटचे सहकारी आहेत. त्यांना अनेक भारतीय भाषा अस्खलितपणे बोलता येतात. अतिशय उमदा माणूस व प्रभावी व्यक्तिमत्त्व. तुम्ही कितीही दिवस राहा, काळजी करू नका असे त्यांनी मला अनेकदा सांगितले.
ऋणानुबंध म्हणायचे...त्यांचा टूर्स आणि ट्रॅव्हल्स चा व्यवसाय आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा यात्रेकरूंची गर्दी लोटली होती. सगळी लाॅजेस, आश्रम, धर्मशाळा ओव्हरफुल झाली होती. त्यांना कामामुळे उसंत नव्हती.

दुपारचे १२.३० झाले होते. आश्रमाची जेवणाची वेळ झाली होती. घंटा वाजली. आम्ही भोजनासाठी गेलो. सगळा शिस्तबद्ध कारभार...
तांदळाची खीर, मेदू वडे, सांबार, कारल्याची भाजी व ताक... भरगच्च मेन्यू.
हवे तेवढे घ्या, फक्त टाकू नका. जेवण झाल्यावर स्वतः चे ताट, चमचे, भांडे स्वतः स्वच्छ धुवून ठेवायचे. चांगला नियम व शिस्त.

आश्रमात बरेच विद्यार्थी आढळले. यातील काही लहान तर काही प्रौढ ही होते. तीन वर्षांचे वैदिक व उच्च शिक्षण येथे देतात. तरूण संन्याशी ही येथे बरेच आहेत. सायंकाळी तांदळाची खिचडी,कढी, रस्सा भाजी व पोळी असा मेन्यू होता.

या आश्रमात सर्वांना सरसकट प्रवेश मिळत नाही. अनुयायी, शिष्य, विद्यार्थी यांनाच प्रवेश दिला जातो. आश्रम खूप मोठा, स्वच्छ ठेवलेला परिसर असा आहे. शंकराचे मंदिर, स्वामीजींचे समाधी स्थान,यज्ञ शाळा, पाहुण्यांसाठी सुसज्ज व वातानुकूलित खोल्या. मोठे भोजन गृह. पार्किंगसाठी भरपूर जागा.

आश्रमाच्या मागील बाजूस गंगा वाहात असते. त्यावर बांधलेला घाट. सायंकाळी मनोहारी वातावरण असते. लोक पायऱ्यांवर येऊन बसतात. कोणी एकटा येतो, तर कोणी सहकुटुंब.
कोणी ध्यानात मग्न तर कोणी मित्र मैत्रिणींशी हितगुज करण्यात मशगुल. कोणी आरती करून दिले पाण्यात सोडतो तर कोणी पाण्यात पाय सोडून विचारात हरवलेला... कोणी पाण्यात खेळत असतात तर कोणी दुरूनच गंगामैय्याला डोळ्यात साठवत असतात...घाटाच्या पायऱ्यांवर बांधलेल्या रस्त्यावर व्यायाम करणारे, सन्याशांची ये-जा चालू असते...बऱ्याच वृद्धांची मनिषा सफल झाल्याची भावना.

 संध्याछाया पसरत असतात, समोर गंगामैय्या संथपणे वाहात असते, कोणीतरी आरती करून सोडलेले दिवे हेलकावे खात पुढे जात असतात, मधूनच एखादा मासा पाण्यावर उडी मारून क्षणात पाण्यात लुप्त होतो, मासे आपल्याशी लपाछपी खेळत असतात... प्रत्येक आश्रमाच्या गंगारती होतात. हा छोटेखानी सोहळा असतो.
चटई पसरून बसलेले भाविक. मंत्र म्हणणारे विद्यार्थी, दीपमाळेला लावलेल्या वाती...उदबत्तीचा सुगंध, वातींचा धूर...

हळूहळू काळोख आपले बाहू पसरतो. उरल्या सुरल्या संधीप्रकाशाला कवेत घेतो. लोक घरी परतू लागतात... मागे उरतो गंगामैय्याचा आवाज, दूरवर दिसणारे मंदिराचे दिवे, साधनामस्तांसाठी उत्तम वेळ... कालचक्र आहे हे...न थांबणारे.
मर्त्य मानव, आज असणारे उद्या नाहीत... निसर्ग मात्र तोच आहे...

गुरुदेव दत्त...
🙏

क्रमशः ...

©️ लेखक व वाटसरू
*उदय नागनाथ*
*गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ बद्रीनाथ व हेमकुंड साहेब...*

                         *पुष्प - ३*


ऋषिकेश होऊन पुढे निघालो. पहाटे पावणे चार वाजता रामानंद आश्रम सोडला. गल्लीबोळातून चालत असताना, १-२ श्वान अंगावर धावून आले. मी शांतपणे चालत राहिलो. मी निरुपद्रवी आहे हे लक्षात आल्यावर ते शांत झाले.  वाटेत एक-दोन रिक्षाचालक ग्राहकांची वाट पहात बसले होते.  गुगल बाबा की जय. तो दाखवत असलेल्या रस्त्यावरून गंगा किनार्‍यावरुन चाललो होतो. दूरवर कुठेतरी श्वानांचा आवाज येत होता. किनाऱ्यावरून चालताना  उजव्या हाताला गंगामैयाचा खळखळ आवाज शांततेत जाणवणारा. तर डाव्या हाताला आश्रम, हॉटेल, लॉजेस. उजव्या हाताला *जानकी सेतू*, पादचारी आणि दुचाकींसाठी बांधलेला. अंधारात त्याच्यावरील दिवे लक्ष वेधून घेत होते. बसण्यासाठी बांधलेल्या तसेच गंगा किनारी काही यात्रेकरू उघड्यावर झोपले होते. पहाटेच्या वेळी रस्त्यावर मी एकटाच.

रामानंद आश्रम मनाला भावला.  दिखाऊपणा नाही, भपका नाही‌.  तेथे राहण्याचा योग आला. वेळ आली राहिलो, आनंद घेतला, निघालो... आपल्या सर्वांना नदी, नाले, झरे, वारा यांच्यासारखे वाहते राहता यायला पाहिजे.  वाहणारे पाणी स्वच्छ राहते. मनाला भावते.  रोगराई होत नाही. बंद खोलीतील हवा कुबट होते. तसेच माणसाने सुद्धा सतत वाहते राहायला पाहिजे. याचा अर्थ संसार सोडून संन्यासी व्हावे असे नाही.  तर घराबाहेर पडून प्रवास 
करण्याऐवजी शरिराचे चोचले पुरवणाऱ्या ठिकाणी थांबून, अडकून पडू नये. नाहीतर एक प्रपंच सोडायचा आणि दुसरा तयार करायचा असे होते.  हे लक्षात येत नाही, हे खरे.
चरैवेति चरैवेति...
चालत राहा... चालत राहा...

चालताना वाटेत पेड पार्किंग बाहेर बसलेल्या दोघांना नरेंद्र नगर चा रस्ता विचारला. त्यांनी दाखवलेल्या दिशेने चालू लागलो.  त्यातला एक जण म्हणाला बाबूजी नरेंद्रनगर तो यहा से बहुत दूर है टॅक्सी करनी पडेगी.  मी ठिक आहे असे म्हणालो आणि पाऊल उचलले. पुढे चढाचा रस्ता लागला.  गुगल बाबांनी जिथे वळायला सांगितले होते तिथे रस्त्यावर पाणी जाण्यासाठी चारी बांधली होती आणि त्याच्या मागे जंगलात जाणारी पायवाट दिसत होती. गुगल बंद केले व तसाच पुढे चालत राहिलो. रस्त्यावर विचारायला कोणी नव्हते.  पुढे गेल्यावर हायवेवर पाटी लागली नरेंद्र नगर.  डाव्या हाताला वळलो. आपले लक्ष नरेंद्रनगर होते.  इथून पुढे चढाचा रस्ता... घाट... घाट आणि घाट.  हिमालयात जाण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली. समोरून मागून वाहने चालली होती. अर्धा तास चालल्यानंतर एका ठिकाणी तीन रस्ते येऊन मिळाले होते. तेथे पोलिसांनी पुढे जाणारा रस्ता बंद केला होता.  चौकशी केल्यावर पुढे दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद होता व राडारोडा उचलून रस्ता क्लिअर करण्याचे काम चालू होते. त्यामुळे रस्ता बंद केल्याचे त्यांनी सांगितले. थांबलेल्या वाहनातील, रात्रभर प्रवास करून आलेले प्रवासी बराच वेळ वाहन थांबून ठेवल्यामुळे त्रस्त होऊन गाडीतून खाली उतरून येरझाऱ्या मारत होते. पोलीस चेक पोस्ट शेजारीच काली मातेचे मंदिर होते. सकाळच्या शांततेत कोणीतरी घंटा वाजवली त्याचा आवाज निरव शांततेत छान घुमला. मी चालत चाललो आहे, असे सांगितल्याने मला पुढे जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली.पोलिसांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी पुढे निघालो.


 माझ्यासोबत एका हातात काठी व एका हातात पाण्याचा कॅन घेऊन एक जेष्ठ नागरिक पुढे चालले होते. झप झप  चालून त्यांना गाठले आणि चौकशी केली.  त्यावर त्यांनी मी व्यायामाला चाललो असून त्यांचे नाव केपीएस नेगी असे त्यांनी सांगितले . हातातला कॅन,  लावलेल्या झाडाला पाणी घालण्यासाठी घेऊन जात आहे असे ते म्हणाले नेगी हे आडनाव ऐकल्यावर मला पूर्वी भारतीय हॉकी संघात असलेल्या मीर रंजन नेगी या गोलकीपर ची आठवण झाली. चालताना ते हातातील काठी रेलींगवर आपटत आवाज करत चालले होते. याचे कारण विचारले असता रात्री रस्त्यावर हत्ती येतात‌. त्यांना पळवण्यासाठी मी काठीचा रेलींगवर आवाज करतो असे त्यांनी सांगितले. ऐकून माझी दातखीळ बसली.
काठीच्या आवाजाने बाकी जंगली पशु पळून जातात. पण हत्ती मात्र जाम हलत नाही. तो ठाम उभा राहतो व प्रसंगी अंगावर धावून येतो अशी पुष्टीही त्यांनी जोडली.  हे गृहस्थ दहा मिनिटात परत जाणार होते. पुढे अंधारात घाट रस्त्यावर जंगलातून मला एकट्यानेच प्रवास करायचा होता. सगळाच उत्तराखंडाच्या घाट रस्ता जंगलाचा आणि प्राणी असलेला असा आहे.
हा प्रसंग माझ्यावर आला असता तर सामान टाकून पळून जाण्याशिवाय माझ्या हातात दुसरे काही नव्हते.  बघू या. गुरुदेव दत्त म्हणालो, जे येईल त्याला सामोरे जाण्याचे ठरवले आणि मी रेलींगवर काठी आपटत पुढे निघालो‌.

नरेंद्र नगर, हिंडोलाखाल, दुवाधार, आगराखाल, फकोट, बेमुंडा, खाडी, नांगणी, चंबा ही रस्त्यातील काही गावांची नावं.  गूगल बाबांनी दाखवलेल्या दोन गावाच्या मधील अंतर आणि प्रत्यक्षात अंतर यात फरक असल्याचे लक्षात आले. चंबाला नाष्टा केला चहा पिताना टपरीवाल्याशी बोलताना तो म्हणाला की, येथून गंगोत्री दोनशे किलोमीटर आहे. नवीन धरण बांधल्यामुळे आधीचा रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे गंगोत्रीला जाताना तीस ते पस्तीस किलोमीटरचा फेरा पडतोय व त्यामुळे अंतर वाढले आहे अशी माहिती त्यांनी टपरी चालकाने मला पुरवली.

उत्तराखंड म्हणजे डोंगरी भाग. गंगोत्रीला जाताना जास्त चढ उतार कमी.  या राज्यात अनेक डोंगर रांगा आहेत.  येथील सर्वात मोठे शिखर नंदादेवी. आपण सुरुवात करतो छोट्या डोंगरातून पुढे हळूहळू गगनचुंबी सुळके स्वागतासाठी उभे असतात. त्यानंतर हळूहळू दिसू लागतात बर्फाच्छादित डोंगर आणि त्यांच्या अंगावर वाढलेले सूचिपर्णी वृक्ष. 

या भागात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ( BRO ) आणि स्थानिक प्रशासन यांचे रस्ता बांधणी व  देखभाल आणि दुरुस्ती यांचे काम ३६५ दिवस चालूच असते. कोसळलेल्या दरडी उचलणे, रस्ता मोकळा करणे, वाहून गेलेला रस्ता पुन्हा नीट करणे, पूल दुरुस्त करणे,  कोसळण्याची शक्यता असलेल्या दरडी उतरवणे अशी अनेक कामे ते अविश्रांत करत असतात. सर्व रस्त्यावर जागोजागी पाट्या लावलेल्या दिसून येतात येथे थांबू नका, वाहन उभे करू नका, दरड कोसळण्याची शक्यता इत्यादी... वाटेत एका ट्रकचा मागचा ॲक्सल तुटून , मागील दोन चाके वेगळी झाली होती. 

प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची धडपड चालू आहे. जसे जसे आपण पहाडी भागात आत जातो तसे तसे सर्व गोष्टींचे परिमाण बदलत जातात उपलब्ध साधन संपत्ती, सुविधा या कमी होत जातात.  या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यात जमा आहे. सर्व भार खाजगी वाहतूक व्यवस्थेवर सोपवलेले दिसतो. सहाजिकच नफेखोरीसाठी जास्त प्रवासी भरून वाहने निघणे यावर कंत्राटदारांचा भर असतो. पंचवीस क्षमतेच्या बसमध्ये ४५ लोक भरले जातात. हात दाखवल्यावर वाहन उभे राहते. भाजीपाला, दूध, फळे, किराणामाल दूरवरून आणावा लागतो.
१०० किलोमीटरच्या परिसरात एखादे कॉलेज. इंजीनियरिंग कॉलेज राज्याच्या मुख्यालयामध्ये म्हणजे डेहराडूनला. आरोग्य सेवांची व्यवस्था तर विचारूच नका. जिल्हा आरोग्य केंद्रांमध्ये एक पुरुष व एक महिला डॉक्टर. तेच सर्व आजारांवर उपचार करणार. बाळंतपणात गुंतागुंत निर्माण झाल्यास पेशंटला सुरक्षित रुग्णालयात हलवे पर्यंत रुग्ण दगावणावरच. एकट्या पुणे शहरात ७० हून अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत असे समजते. आपला आदिवासी भाग व येथील दुर्गम डोंगरी भाग यात फार फरक नाही. स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली तरी पण आदिवासी आणि डोंगरी लोक अजून दुर्लक्षितच आहेत असे खेदाने नमूद करावेसे वाटते. दोन वर्षांच्या कोव्हिडच्या कालावधीत इथे काय परिस्थिती झाली आहे याचा आपण अंदाज तरी बांधला आहे का ?

गुरुदेव दत्त...
🙏

क्रमशः ...

©️ लेखक व वाटसरू
*उदय नागनाथ*

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

कोकण पर्यटन

फिरायला जायचं आहे तर उत्तम पर्याय आहेत कोकणातील पर्यटन स्थळे - Places To Visit In Konkan
फिरायला जाण्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळी ठिकाणं असतात. पण बऱ्याचदा प्लॅन केला जातो तो कोकणात फिरायला जायचा. कोकणातील पर्यटन स्थळे अनेक आहेत. कोकण सहल काढणं म्हणजे खरं तर एक मजा. कोकण पर्यटन स्थळे नक्की कोणती, तिथे कसं जायचं, कुठे फिरायचं असा प्रश्नही पडतो. कोकण दर्शन माहिती मराठी मध्ये आपल्याला नेहमीच जाणून घ्यायला आवडते. कोकण हा खरं तर महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया असे नेहमीच म्हटले गेले आहे. इथले समुद्रकिनारे, शुद्ध हवा, परिसर, हिरवळ या सगळ्याने मन प्रसन्न होऊन जाते. इतकंच नाही तब्बेतही चांगली होते. इथली हवाच निराळी आहे. त्यामुळे रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून सुटका हवी असेल तर कोकण सहल ही किमान एकदा तरी करायला हवी. तुमचं कोकणात घर असेल तर मग मजाच आहे. पण जर घर नसेल आणि तुम्हाला कोकणात फिरायला जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट द्यायला हवी जी आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. कोकणात खरं तर अनेक ठिकाणं फिरण्यासारखी आहेत. काही प्रसिद्ध आहेत तर काही प्रसिद्ध नाहीत तरीही सुंदर आहेत जिथे किमान एकदा जाऊन तरी तुम्ही भेट द्यायला हवी. पाहूया कोणती आहेत ही ठिकाणं.

कशेळी, कनकादित्य मंदिर (Kankaditya Mandir)

रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी हे लहानंसं गाव आहे. अजूनही इथे मातीचे रस्ते आणि कोकणातील शुद्ध आणि स्वच्छ वातावरण जपलं गेलं आहे. गावची वस्ती तशी जास्त नाही. पण या गावात दोन मंदिर आहेत. त्यापैकी एक लक्ष्मीनारायण मंदिर आणि एक आहे ते कनकादित्य मंदिर. सूर्याची केवळ सात मंदिरे संपूर्ण भारतामध्ये आहेत आणि त्यापैकी एक मंदिर आहे ते म्हणजे कनकादित्याचं मंदिर. हे मंदिर कसं निर्माण झालं याचीही एक गोष्ट नेहमी सांगितली जाते. एक गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना भरपूर प्रयत्न केले पण जहाज काय जागचे हलले नाही. शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले. कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती. तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्य मूर्ती आली आणि भगवान सूर्यनारायणाने कनकेला म्हनाले की तू मला येथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांध त्यात माझी स्थापना कर. कनकाबाईने ही गोष्ट त्यावेळी ग्रामस्थांना सांगितली मग ग्रामस्थांच्या मदतीने ती सूर्य मूर्ती गावात आणून स्थापना केली. त्या कनकाबाई मुळे घडले त्यामुळे कनकेचा आदित्य म्हनून कनकादित्य असे या मंदिराला नाव पडले.

कसे पोचावे - रत्नागिरी पर्यंत ट्रेन आणि त्यानंतर रिक्षा अथवा एस. टी. , राजापूरपासून धारतळे आणि मग आडिवरे अशी एस. टी.

वैशिष्ट्य - रथसप्तमी उत्सव पाच दिवस चालणारा हा उत्सव कशेळी आणि आजूबाजूच्या गावासाठी महत्त्वाचा काळ असतो. या उत्सवात कनकादित्य आणि कालिकादेवी यांचे होणारे लग्न हा सर्वांसाठीच आवर्जून बघण्याचा लग्नसोहळा असतो. कनकादित्या मंदिरामध्ये साधारण 850 वर्षांपूर्वीचा ताम्रपटही आहे. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 3000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

आडिवरे, महाकाली मंदिर (Adivare Mahakali)
कशेळी गावापुढील गाव असणारे आडिवरे हे तेथील महाकाली मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. इथे कायम भक्तांची रांग असते. पण कितीही गर्दी असली तरीही इथे अतिशय प्रसन्न वाटते आणि त्याशिवाय शांतताही असते. महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशा तीन देवी अनेकांच्या कुलदेवता आहेत. त्यापैकी महाकाली ही कुलदेवता या ठिकाणी आहे. इसवी सनाच्या ९व्या शतकात भंडारी ज्ञातीचे लोक वेत्ये या त्यांच्या समुद्राकाठच्या गावी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचे जाळे अडकून पडले. बरेच प्रयत्न करूनही जाळे वर येईना तेंव्हा त्यांनी जलदेवतेची करुणा भाकली. त्यांच्यापैकी मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन श्री महाकालीने दृष्टान्त दिला आणि मी महाकाली आहे, तू मला वर घे आणि माझी स्थापना कर असे सांगितले. त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी जाळे ओढले असता त्यांना काळ्या पाषाणातील महाकालीची मूर्ती सापडली आणि त्यांनी दृष्टांताप्रमाणे सर्वांना मध्यवर्ती अशा "वाडापेठ" येथे देवीची स्थापना केली अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. महाकाली देवी अनेकांना प्रसन्न होते असंही म्हटलं जातं. 

कसे पोचावे - रत्नागिरी पर्यंत ट्रेन आणि त्यानंतर रिक्षा अथवा एस. टी
वैशिष्ट्य - अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये महाकाली मंदिरात यात्रा भरते. या यात्रेसाठी खूपच गर्दी होते. उत्सव काळात देवीला वस्त्रालंकारांनी नटवले जाते. याच काळात दैनंदिन कार्यक्रमांबरोबर पालखी सोहळा, सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हा पालखी सोहळा म्हणजे एक विहंगम दृष्यं असते. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 3000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

तारकर्ली (Tarkarli Beach)
कोकणात आल्यानंतर सर्वात जास्त ओढ असते ती समुद्रकिनाऱ्याची आणि आता कोकणामध्ये तारकर्लीचा समुद्रकिनारा हा खूपच प्रसिद्ध झाला आहे. कारण आता या समुद्रकिनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग आणि अन्य अॅक्टिव्हिटीही सुरू करण्यात आल्या आहेत. कोकणामधील सर्वच समुद्रकिनारे हे अतिशय स्वच्छ आहेत आणि त्यामध्ये तारकर्लीचा समुद्रकिनारा हा पुढे आहे असं म्हटलं जातं. या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनही आहेत आणि त्यांना बघण्यासाठीही अनेक जण कोकण सहल काढताना तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्याला मुद्दाम भेट देतात. 

कसे पोचावे - कुडाळ स्टेशनला उतरून रिक्षा अथवा एस. टी. अथवा स्वतःची गाडी 

वैशिष्ट्य - तारकर्लीचा समुद्रकिनारा हा त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. इतकंच नाही  इथलं पाणी अतिशय स्वच्छ आहे. दिवसा साधारण 20 फूट खोलीपर्यंत तुम्ही डोळ्याने स्वच्छ पाणी पाहू शकता इतकी स्वच्छता या पाण्यामध्ये आहे. त्याशिवाय आजूबाजूला असणारा नयनरम्य निसर्ग हा तुमचा थकवा कुठच्या कुठे पळवून लावतो. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 3 दिवस (प्रति व्यक्ती)

मुरूड - जंजिरा (Murud Janjira)

अलिबागमधील मुरूड - जंजिरा हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण. अलिबाग हा कोकणचा एक भाग असून याठिकाणी अनेक समुद्रकिनारे आहेत. इथल्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. या कोकणच्या भागात नेहमीच सहल काढण्यात येते.  शिवाय कोकण पर्यटन स्थळे म्हणून अलिबागमधील अनेक स्थळं प्रसिद्ध आहेत. त्यापैकी मुरूड-जंजिराला तर इतिहास लाभला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. आणि चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला असा होतो. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आणि त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला. आजही हा किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. 

कसे पोचावे - गेट वे ऑफ इंडियावरून लाँच अलिबागपर्यंत. अलिबाग ते मुरूड जंजिरा एस. टी. अथवा रिक्षा 

वैशिष्ट्य - इतिहासप्रेमी आणि किल्लाप्रेमींंसाठी मुरूड - जंजिरा किल्ला ही पर्वणीच आहे. याचा इतिहास जाणून घेतल्यानंतर आपोआपच अभिमान जागृत होतो. या किल्ल्याची तटबंदी ही बुलंद आहे आणि  हेच याचे वैशिष्ट्य आहे. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)



रत्नदुर्ग किल्ला (Ratnadurga Fort)
रत्नदुर्ग किल्ला 

रत्नागिरीपासून साधारण दोन ते तीन किलोमीटर वर असणारा हा रत्नदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे असलेले भगवती मंदिर. समुद्रापर्यंत इथे भुयारी मार्ग जातो. इथे येणारे प्रत्येक पर्यटक हे इथल्या विहंगम दृष्यामुळे मोहून जातात. हा किल्ला समुद्राच्या काठावरील असणाऱ्या डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याच्या पाथथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. 

कसे पोचावे - रत्नागिरी स्टेशनपासून रिक्षा 

वैशिष्ट्य - किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच भगवतीचे शिवकालीन मंदिर अतिशय सुबकरित्या बांधण्यात आले आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते जिथे  तीन तोंडाचा भुयारी मार्ग आहे. आता हा भुयारी मार्ग वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे लागणाऱ्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट ज्याठिकाणी होतो तेथे असलेली प्रचंड गुहा स्पष्ट दिसते.

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

श्रीवर्धन (Shrivardhan Beach)
श्रीवर्धनचा प्रसिद्ध समुद्रकिनारा

अतिशय शांत आणि रम्य असणारा हा समुद्रकिनाराही त्याच्या स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. या समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला फेसाळ लाटांमध्ये फिरायला खूपच मजा येते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे. इथून दिसणारा सूर्यास्त हा अप्रतिम असतो. अर्थात सर्वच समुद्रकिनाऱ्यांवरून सूर्यास्त चांगला दिसतो पण श्रीवर्धन किनाऱ्यावरून समुद्राच्या काठावरून पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. श्रीवर्धनमधील लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे. शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली विष्णुमूर्ती आवर्जून पाहावी अशी आहे. सुमारे दोन फूट उंचीची काळ्या पाषाणाची ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असून शिलाहार काळातील असावी असा अंदाज आहे. 

कसे पोचावे - मुंबईवरून एस. टी., बस 

वैशिष्ट्य - श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिर २००-२५० वर्षांपूर्वीचे आहे. अगस्ती मुनींनी याची स्थापना केली, असे मानले जाते. या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केला. येथील कोरीव काम व जुन्या काळातील समया बघण्यासारख्या आहेत असे सांगितले जाते. कोकण पर्यटन करायचे असेल तर श्रीवर्धनला भेट दिलीच पाहिजे. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 6000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

धुतपापेश्वर (Dhutpapeshwar)
धुतपापेश्वर मंदिर

शांत आणि डोंगराच्या मधोमध असणारं हे काळ्या पाषाणातील शिवलिंग असणारं निसर्गाचं अप्रतिम ठिकाण. पेशवेकालीन बांधकाम या मंदिरात असून इथे लाकडात खूपच आकर्षक काम करण्यात आलं आहे. यावर अनेक कलाकुसरी आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत. हे मंदिर पुरातन असून सहसा पावसाळ्याच्या दिवसात येथील धबधबा बघण्यासाठी अनेक पर्यटक जातात. इथे शंकराचे असलेले मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हा अतिशय नयनरम्य आणि मनोहारी आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे कोकणातील भटकंतीचा आणि दाट वनराईचा आणि वळणाच्या रस्त्यांचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर इथे नक्की भेट द्यायला हवी.  

कसे पोचावे - रत्नागिरी स्टेशनपासून रिक्षा 

वैशिष्ट्य - पताक्यांचा वापर करून तयार करण्यात आलेले शिवलिंग हे येथील वैशिष्ट्य आहे. हे शिवलिंग खूपच मोठे असून अतिशय आकर्षक आहे. महाशिवरात्रीच्या वेळी या ठिकाणी खूपच मोठा उत्सव होतो जिथे आजूबाजूच्या गावातील अनेक लोक दर्शनाला येतात. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

महाशिवरात्र - महाराष्ट्रातील कोणती आहेत खास प्राचीन शिवाची मंदिरे

थिबा राजवाडा (Thiba Palace)
थिबा राजाचा राजवाडा 

कोकणात फिरण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांपासून ते राजवाड्यापर्यंत सर्व काही आहे. कोकणाला एक इतिहास लाभला आहे. त्यापैकीच एक स्थळ म्हणजे थिबा राजवाडा. रत्नागिरीमध्ये हा थिबा राजवाडा असून यामध्ये एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. आताचे म्यानमार अर्थात पूर्वीच्या ब्रम्हदेशाच्या थिबा मिन राजाला येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. थिबाने वापरलेल्या अनेक गोष्टी येथे जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. हा राजवाडा त्याकाळी ब्रिटिशांनी बांधला असून आता पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. 

कसे पोचावे -  रत्नागिरी स्टेशनपासून रिक्षा 

वैशिष्ट्य - थिबा राजा आणि राणी हे दोघेही या राजवाड्यात राहात होते आणि त्यांनी वापरलेल्या अनेक गोष्टी इथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. त्या पाहण्यासाठी कोकण सहल काढून अनेक पर्यटक इथे येत असतात. त्याशिवाय कोकणातील पर्यटन स्थळे म्हटली की थिबा राजवाड्याचं नाव आलं नाही असं होत नाही. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 4000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

लोकमान्य टिळक घर (Lokmanya Tilak House)
लोकमान्य टिळकांचं घर

लोकमान्य टिळक हे व्यक्तिमत्व मराठी माणसाला माहीत नाही असा एकही माणूस सापडणार नाही. लोकमान्य टिळकांचे घर हे रत्नागिरीत आहे. आजही अनेक पर्यटकांसाठी हे घर उघडे आहे. कोकण सहल काढणार असाल तर तुम्ही लोकमान्य टिळकांचं हे घर पाहायलाच हवं. रत्नागिरी शहरातील टिळक आळीतमध्ये टिळकांचं टुमदार घर आजही तसंच आहे. साधारण दहा वर्षे टिळक याच घरामध्ये राहात होते. हे घर महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व खात्याने जतन केले असून स्मारक म्हणून घोषित केले आहे. हे घर पाहिल्यानंतर टिळकांबद्दलचा अभिमान अधिक दाटून येतो हे नक्की. 

कसे पोचावे - रत्नागिरी स्टेशनपासून रिक्षा 

वैशिष्ट्य - स्वातंत्रसंग्रामातील लोकमान्य टिळक यांनी दिलेले योगदान खूपच मोठे आहे. या घरात त्याच्या स्मृती जतन करून ठेवलेल्या आहेत. आपल्यालाही या आठवणींनी एक स्फूर्ती मिळते. सोमवार वगळता इतर सर्व दिवशी तुम्हाला इथे जाऊन नक्की भेट देता येईल. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 4000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

रायगड किल्ला (Raigad Fort)
शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला 

महाराष्ट्रीची शान रायगड किल्ला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा भाग कोकण पट्ट्यात येतो.  रायगडमध्ये अनेक डोंगर किल्ले आणि समुद्रकिनारे आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातील राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ला हा तर कोकण पर्यटकांसाठी पर्वणी आहे. रायगड किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे. त्याशिवाय हा किल्ला फिरण्यासाठीही खूपच मोठा आहे. इतक्या वर्षांनंतरही रायगड किल्ल्याची शान महाराष्ट्राने जपून ठेवली आहे. दरवर्षी शिवाजी महाराजांच्या जयंतीला इथे मोठा सोहळा साजरा करण्यात येतो. 

कसे पोचावे - गाडी, बस 

वैशिष्ट्य - किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. मराठी इतिहासामध्ये या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवराज्याभिषेक हा सर्वात मोठा अनुभव या किल्ल्याने अनुभवला आहे. या किल्ल्यामध्ये शिवरायांनी सर्वात जास्त वास्तव्य केले असे सांगितले जाते. या किल्ल्यावर जिजाबाईंचा वाडा, खुबलढा बुरूज,  नाना दरवाजा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्तीतलाव, स्तंभ, मेणा दरवाजा, पालखी दरवाजा, राजभवन, राजसभा, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी, टकमक टोक, हिरकणी टोक इतक्या सगळ्या भारावलेल्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 2000 आणि 1 दिवस (प्रति व्यक्ती)

किहिम समुद्रकिनारा (Kihim Beach, Alibaug)
किहिम समुद्रकिनारा 

अलिबागमध्येच असणारा हा कोकणातील स्वच्छ आणि सुंदर असा किहीमचा समुद्रकिनारा. सरखल कान्होजी आंग्रे यांच्या अखत्यारीत किहिम समुद्रकिनारा अधिक प्रसिद्ध झाला. शिवरायांच्या काळात नौदलासाठी हा समुद्रकिनारा महत्त्वाचा मानण्यात आला होता. आता या समुद्रकिनाऱ्यावर अनेक पर्यटक फिरायला येतात. इथली पांढरी आणि मऊशार वाळू फिरण्यासाठी अधिक छान भासते.

कसे पोचावे - गेट वे ऑफ इंडियावरून लाँचने अलिबाग आणि तिथून रिक्षा वा बस 

वैशिष्ट्य - या समुद्रकिनाऱ्यावरील वाळू ही अतिशय मऊ आणि पांढरी आहे. त्याशिवाय इथे कोणत्याही प्रकारची घाण तुम्हाला दिसून येत नाही.  दोन दिवसात पटकन फिरून येता येते. इथली हवा शुद्ध असल्याने रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरे वाटते. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

गणपतीपुळे (Ganpatipule)

गणपतीपुळेला इतिहास लाभला आहे. कोकण म्हणजे गणपतीपुळे असं एक गणितच होऊन गेलं आहे. साधारण 1600 वर्षांपूर्वी समुद्रकिनाऱ्यावर निर्माण झालेलं हे स्वयंभू गणपतीमंदीर येथील वैशिष्ट्य आहे. याचं पश्चिम द्वार असल्यामुळे हे याचं वैशिष्ट्य ठरतं. हा समुद्रकिनारा खूपच सुंदर असून गणपतीचं मंदीर असल्यामुळे याला पवित्र ठिकाण मानलं जातं. या समुद्रकिनाऱ्यावरील वाळू ही पांढरी असल्यामुळेच याला गणपतीपुळे असं नाव देण्यात आलं आहे. 

कसे पोचावे - मुंबई सेंट्रलवरून एस. टी., ट्रेन,  स्वतःची गाडी 

वैशिष्ट्य - गणपतीपुळेला गणपतीचं पुरातन मंदिर तर आहेच. पण आता या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची संख्या वाढत असल्याने हॉर्स रायडिंग, बोटिंग असे पर्यायही उपलब्ध आहेत. त्याशिवाय जवळच असणारा जयगड किल्लाही पाहण्यासारखा आहे.

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

आरे वारे समुद्रकिनारा (Are-Ware)

रत्नागिरीच्या अनेक समुद्रकिनाऱ्यांपैकी असणारा आरे वारे बीच हा अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा म्हणून प्रसिद्ध आहे. आरे वारे हा आता कोकणात सहल काढण्यासाठी उत्तम पर्याय झाला आहे. इथे मनाला मिळणारी शांतता आणि मुळात असणारा स्वच्छपणा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. दोन्ही बाजूला डोंगर आणि मध्ये समुद्र असा मनमोहक निसर्गाचा नजारा इथे पाहायला मिळतो. आरे वारेच्या समुद्रकिनाऱ्याला आता बरेच पर्यटक भेट देऊ लागले आहेत. 

कसे पोचावे - रत्नागिरीवरून रिक्षा अथवा एस. टी.  

वैशिष्ट्य - रत्नागिरीमध्ये असलेल्या समुद्रकिनाऱ्यांपैकी सर्वात जास्त प्रसिद्ध असणारा आरे वारे हा समुद्रकिनारा आहे. आरे वारे हे दोन आजूबाजूला असणारे समुद्रकिनारे असून भौगोलिकदृष्ट्या आश्चर्य असणारे हे किनारे असल्याचं म्हटलं गेलं आहे. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

हरिहरेश्वर (Harihareshwar)
चिंचोळे रस्ते, अजूनही शहरीकरण न झालेलं हरिहरेश्वर गाव आणि समुद्राची कानी पडणारी गाज. या गावात पोचताच इथलं साधेपणा तुम्हाला आपलासा वाटू लागतो. तसंही मुंबईकरांना गर्दीतून सुटका हवी असतेच. आता प्रत्येक घरात या सुट्ट्यांमध्ये कुठे जायचं याचं प्लॅनिंग झालं असेल किंवा सुरू असेल. दरवर्षी कुटुंबाला एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी फिरायला नेणं जरा कठीणच आणि रिसोर्ट्स पिकनिक्सचाही कंटाळा आला असेल तर हरिहरेश्वरला नक्कीच भेट द्यायला हवी. 

कसे पोचावे - हरिहरेश्वर हे मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे माणगाव आहे. जे इथून जवळपास 60km अंतरावर आहे. एसटीच्या अनेक बसेस हरिहरेश्वरला जातात. तसंच तुम्ही खाजगी वाहनानेही इथे पोचू शकता. 

वैशिष्ट्य - हरिहरेश्वरमध्ये अजून जास्त हॉटेल्स नाहीत पण तुम्ही होम स्टेचा ऑप्शन घेऊ शकता. जो चांगला आणि स्वस्तही आहे. एमटीडीसीची इकडे कॉटेजेस आहेत. हरिहरेश्वराला कधीही वर्षभरात कधीही भेट देऊ शकता पण जास्त उन्हाळा असल्यास मात्र टाळा. 

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

दापोली (Dapoli)

कोकणच्या हृदयात वसलेलं निसर्गरम्य दापोली हे मुंबईपासून फक्त काही तासांच्या अंतरावर आहे. इथली पर्यटकांची गर्दी गेल्या काही वर्षात वाढली असली तरी अजूनही इथे पूर्णपणे व्यावसायिकीकरण झालेलं नाही. नेहमीच्या रूटीनपासून ब्रेक हवा असल्यास दापोलीला नक्कीच भेट देता येईल. याची मुख्य कारण म्हणजे इथले निसर्गाचं वरदान लाभलेले स्वच्छ आणि कमी गर्दी असलेले समुद्रकिनारे आणि सुट्टीमध्ये एन्जॉय करण्यासाठी मिळणारे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. 

कसे पोचावे - एस. टी. , बस, स्वतःची गाडी, ट्रेन 

वैशिष्ट्य - दापोली म्हणजे समुद्रकिनारे यात समावेश होतो तो केळशी, दाभोळ, बुरोंडी या किनारपट्टी भागाचा. येथील समुद्रकिनाऱ्यांमध्ये प्रसिध्द असलेले किनारे म्हणजे कर्दे बीच, केळशी बीच, मुरूड बीच, लाडघर बीच, कोळथरे बीच आणि तामस तीर्थ बीच. पर्यटकांची संख्या वाढूनही आजही इथले समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर आहेत, हे विशेष. एवढंच नाहीतर इथल्या काही बीचवर तुम्हाला डॉल्फीन आणि वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करता येतील तर काही किनाऱ्यावर फक्त आणि फक्त तुम्हीच असाल एवढा निवांतपणा अनुभवता येईल.

खर्च आणि राहण्याचे दिवस - साधारण 5000 रू. आणि 2 दिवस (प्रति व्यक्ती)

प्रश्नोत्तरे
1. कोकणात जाण्याचा उत्तम कालावधी कोणता?

साधारण ऑक्टोबर ते मे या काळामध्ये तुम्ही कोकणात कधीही जाऊ शकता. आंब्याचा आस्वादा घ्यायचा असेल तर एप्रिल आणि मे महिना फिरण्यासाठी उत्तम काळ आहे. 

2. कोकणात सर्वात जास्त काय प्रसिद्ध आहे?

कोकणातील समुद्रकिनारे, आंबा, काजू, मंदिरे या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. सर्वात जास्त फिरण्याची ठिकाणं म्हणजे कोकणातील समुद्रकिनारे आणि पुरातन मंदिरे. 

3. पुण्यापासून कोकणात जायला साधारण किती वेळ लागतो?

पुण्यापासून कोकणात जायला साधारण 13-14 तास लागतात. पुण्यातून अनेक एस. टी. आहेत. त्याशिवाय आता अनेक ट्रेननेही प्रवास करता येतात. 

4. कोकणातील सर्वात चांगले समुद्रकिनारे कोणते?

गणपतीपुळे, भाट्याचे पुळण, आरे वारे, भोगवे,वेंगुर्ले, आचरा, चिवला,मालवण, तारकर्ली हे अतिशय प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. या ठिकाणी अतिशय स्वच्छ समुद्रकिनारे असून इथे फिरायला मजा येते. 

5. कोकणात पोहचायला मुंबईतून किती वेळ लागतो?

ट्रेनने कोकणात पोहचण्यासाठी साधारण 9 तास लागतात. तर बस अथवा एस. टी. ने कोकणातील काही भागामध्ये पोहचण्यासाठी 12 तास लागतात. 

6. कोकण पट्टा नक्की कोणता आहे?

रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, मुंबई हा संपूर्ण कोकणपट्टा आहे. पण तरीही सर्वात जास्त पर्यटक हे रत्नागिरी आणि रायगड या ठिकाणी फिरायला जातात.

मंगळवार, १ डिसेंबर, २०२०

राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा 2020
परिस प्रकाशन आणि भटकंती एक्सप्रेस आयोजित राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेतील अंतिम फेरीतील काही फोटो youtube वर अपलोड  करण्यात आले आहेत. सर्व बांधवाना नम्र विनंती आहे की सर्व फोटो पाहून like आणि कमेंट करा. तसेच भटकंती एक्सप्रेस  चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भटकंती एक्सप्रेस फेसबुक पेजला देखील करा.
फोटोग्राफी स्पर्धेतील काही फोटोंच्या लिंक खालीलप्रमाणे आहेत.
11) राहुल सिरसेवाड
https://youtu.be/s88Gpr5PhS8
12) श्रीशैल जट्टे लोहारा, उस्मानाबाद
https://youtu.be/IY24McdANJo
13) स्वप्निल अशोकराव साळोखे कोल्हापूर 
https://youtu.be/wGNkn9RvhTs
14) अदिती टापसे. ठाणे.
https://youtu.be/uf-jX8vjLTc
15) मनोज पवार कुर्डुवाडी, सोलापूर.
https://youtu.be/Uw9-8Ur8G5g
 सतीश कोळपे सर लिखित भटकंती एक्सप्रेस हे पुस्तक मिळवाण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करावा. 
1. शंकर शिंदे, अकलूज, सोलापूर  9423039683
2. सतीश कोळपे, दौंड, पुणे,
9823426647
3. डॉ. दीपक ढोक, उमरखेड, यवतमाळ 7588188045
4.शिवशंकर राऊत वाशी,  उस्मानाबाद 9403705825
5. स्वप्नीलकुमार चव्हाण, सातारा  9763976897
प्रायोजक:- सतीश कोळपे, लेखक, भटकंती एक्सप्रेस.
आयोजक:- परिस प्रकाशन व भटकंती एक्सप्रेस परिवार.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙

राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा 2020

राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा 2020
परिस प्रकाशन आणि भटकंती एक्सप्रेस आयोजित राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेतील अंतिम फेरीतील काही फोटो youtube वर अपलोड  करण्यात आले आहेत. सर्व बांधवाना नम्र विनंती आहे की सर्व फोटो पाहून like आणि कमेंट करा. तसेच भटकंती एक्सप्रेस  चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भटकंती एक्सप्रेस फेसबुक पेजला देखील करा.
फोटोग्राफी स्पर्धेतील काही फोटोंच्या लिंक खालीलप्रमाणे आहेत.
6) गणेश जोशी बार्शी, सोलापूर.
https://youtu.be/E6fmZRHft6Y
7) संकेता नरोडे अहमदनगर
https://youtu.be/Bhan4-3z1C8
8) लक्ष्मण वाघ. अकलूज सोलापूर.
https://youtu.be/IiyKN3IuJJI
9) कृष्णा कांबळे पंढरपूर, सोलापूर.
https://youtu.be/TVWWTHhPCG4
10) विक्रम स्वामी  वैराग, सोलापूर.
https://youtu.be/eIZq6qEqrvY
 सतीश कोळपे सर लिखित भटकंती एक्सप्रेस हे पुस्तक मिळवाण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करावा. 
1. शंकर शिंदे, अकलूज, सोलापूर  9423039683
2. सतीश कोळपे, दौंड, पुणे,
9823426647
3. डॉ. दीपक ढोक, उमरखेड, यवतमाळ 7588188045
4.शिवशंकर राऊत वाशी,  उस्मानाबाद 9403705825
5. स्वप्नीलकुमार चव्हाण, सातारा  9763976897
प्रायोजक:- सतीश कोळपे, लेखक, भटकंती एक्सप्रेस.
आयोजक:- परिस प्रकाशन व भटकंती एक्सप्रेस परिवार.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙
राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा 2020
परिस प्रकाशन आणि भटकंती एक्सप्रेस आयोजित राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेतील अंतिम फेरीतील काही फोटो youtube वर अपलोड  करण्यात आले आहेत. सर्व बांधवाना नम्र विनंती आहे की सर्व फोटो पाहून like आणि कमेंट करा. तसेच भटकंती एक्सप्रेस  चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भटकंती एक्सप्रेस फेसबुक पेजला देखील करा.
फोटोग्राफी स्पर्धेतील काही फोटोंच्या लिंक खालीलप्रमाणे आहेत.
1) आनंद बोरा, नाशिक 
https://youtu.be/SOROYEf3SfQ
2) दादासाहेब बाबर, कराड
https://youtu.be/aE1avB9qzpI
3) गुंजन क्षीरसागर अमळनेर, जळगाव
https://youtu.be/6OZV8N7qNio
4) हंसराज देसाई, नाशिक
https://youtu.be/Jg8RRDAcrnw
5) सचिन घोडके वैराग, सोलापूर.
https://youtu.be/Lz62diD6HD8
 सतीश कोळपे सर लिखित भटकंती एक्सप्रेस हे पुस्तक मिळवाण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करावा. 
1. शंकर शिंदे, अकलूज, सोलापूर  9423039683
2. सतीश कोळपे, दौंड, पुणे,
9823426647
3. डॉ. दीपक ढोक, उमरखेड, यवतमाळ 7588188045
4.शिवशंकर राऊत वाशी,  उस्मानाबाद 9403705825
5. स्वप्नीलकुमार चव्हाण, सातारा  9763976897
प्रायोजक:- सतीश कोळपे, लेखक, भटकंती एक्सप्रेस.
आयोजक:- परिस प्रकाशन व भटकंती एक्सप्रेस परिवार.
🥗🥗🥗🥗🥗🥗🥙🥙🥙🥙🥙